Tuesday, 3 July 2018

बेजबाबदार सत्ता - बेपर्वा जनता !


पुन्हा एकदा रेल्वेचा पूल कोसळला आणि पुन्हा एकदा जबाबदारी कोणाची यावर राजकारण सुरु झाले. इथे माणसे जखमी झाली, प्रवासाला निघालेली मधेच अडकली, धावणारी मुंबई जागेवरच थांबली त्याचे काही नाही, उलट आपण कसे जबाबदार नाही हे सांगण्यात धन्यता मानणारे नेते पहिले. मुंबईची जनता पण मुंबईचे स्पिरिट कसे जबरदस्त आहे, ट्रॅकवर उतरून अर्धा किलोमीटर चालून कशी धावती बस पकडली आणि कसा लटकतऑफिसला पोचलो अशा मसालेदार कथा सांगत मुंबई कशी सहनशील आहे, मुंबईकर कसा मार्ग शोधतो हे सांगण्यातच आनंदी असतो. अरे अशा वेळीस ऑफिसला जाच पण त्या जबाबदार अधिकाऱ्याच्या ऑफिसला जा आणि विचार जाब त्या हरामखोराला. कोणीही यायचं टपली मारायची असा प्रकार झालाय मुंबईचा.  सभ्यतेची आणि  गळपटल्यासारखी ततपप ची भाषा सोडा आणि फैलावर घ्या या भडव्यांना. तेव्हा कुठे भानावर येऊन ही मंडळी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतील.  तुम्ही इतकं बेपर्वा राहिलात तर अजून मोठ्या दुर्घटना समोर उभ्या राहतील. एखाद्या चालत्या लोकलवर भर दिवसा पूल पडला असता तर आज तुमच्या माझ्या माहितीतला एक तरी माणूस मेला म्हणून बातमी आली असती. नशिबानं संकट टळलंय.

या कर्तबगार नेत्यांना, जबाबदार अधिकाऱ्यांना आणि अभ्यासू मंत्र्यांना एक सूचना आहे. आता उभ्या असलेल्या सर्व सार्वजनिक बांधकामांवर आणि भविष्यात होणाऱ्या  प्रत्येक सार्वजनिक बांधकामाच्या उदघाटनाला त्या बांधकामाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची ते पण दगडावर कोरून घ्या.  म्हणजे आमचा माणूस नक्की कोणामुळे मेला हे तरी कळेल.

No comments:

Post a Comment