प्रश्न ठाणे मुंबईत राहणाऱ्या सर्व युपी वाल्यांचा नाहीये बरं का.. शेकडो मित्र आहे माझे. प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे, मदतीला धावून येणारे. मेहेनतीच्या पैशातून घेतलेल्या अधिकृत घरात राहतात, कर भरतात, प्रामाणिक व्यवसाय करतात, शेजारधर्म आणि नाती सांभाळतात, भूमिपुत्रांवर प्रेम करतात, अदबीने बोलतात, सणासुदीला तुम्ही त्यांना विसराल पण ते न विसरता तुमच्या पाया पडायला येणार आणि गावाहून येताना थोडं का होईना आपल्या शेतातलं काहीतरी घेऊन येणार. यांच्याबद्द्दल बोलतच नाही कोणी. देश माझाही आहे आणि यांचाही. मोठा प्रश्न आहे या स्वभावा विरुद्ध वागणाऱ्या अनधिकृत हरामखोरांचा , शहराची जागा ढापून, आपल्या नागरी सुविधा लुटून, आपल्याशी उर्मट वागणाऱ्या आणि त्यापेक्षाही मोठा त्यांना चिथावणाऱ्या आणि पाठीशी घालणाऱ्या कुत्र्यांचा. कुत्र्या कुत्र्या बोलून कुत्र्यांचा फार अपमान तर करत नाहीये ना मी ? कारण ज्या शहरात आपण मोठे झालो त्या शहराशी अप्रामाणिक राहणारे हे हलकट नेते प्रामाणिक कुत्र्यांची उपमा देण्याच्या लायकीचे नाहीत. काय अवदसा आठवली आणि ह्या भिकारड्याना मोठं केलं अस काही मराठी नेत्यांना नक्कीच वाटत असेल.
''याचना नही अब रण होगा, संघर्स बडा भीसण होगा'' हे वाक्य आहे त्या भिकमाग्या संजय निरूपमच. काँग्रेस पक्षाचा हा उपऱ्या 'सहरअद्यक्स" काय काय बरळतोय. अरे हिम्मत होते कशी याची मुंबईत राहून भोजपुरीत बोलून अनधिकृत फेरीवाल्याना चिथवायची. स्वतःची बायका पोरं गावाला सोडून आलेली ही मंडळी दुसऱ्याच्या बायकांना कोणत्या नजरेने बघतात, रिक्षावाले तर कोणत्या पद्धतीने वागतात हा तर मोठा विषय आहे. माझे शहर स्वतःच्या बापाचे असल्याच्या थाटात वागून जर आमच्या माणसावर हात उचलणार असाल तर हात उखडून टाकायला वेळ नाही आम्हाला. प्रामाणिक मेहेनत करा, कर भरा, शहर स्वच्छ ठेवा, अधिकृत बाजारपेठा वापरा ... कोणाची ना नाही या गोष्टीला. वेगाने वाढणाऱ्या आणि मोठ्या होणाऱ्या शहरामध्ये गरज आहेच या सर्वांची. जे काम करायला आमची मुलं तयार नाहीत ती कामं तुम्ही करताय, तुमची कुटुंब एखाद्या चाळीत सन्मान पूर्वक राहताहेत, तुमची मुलंबाळं चांगलं शिक्षण घेत आहेत, एक चांगलं वातावरण तयार करून तुम्ही सामाजिक स्वास्थ्य जपताय, कौतुकच आहे तुमचं. पण आमच्या नागरी सुखसुविधा ओरबाडणाऱ्या, अनैतिक धंदे करणाऱ्यांना आणि त्यांच्या 'मुलुख' मधली गुंडगिरी आणि गचाळगिरी इथे करू पाहणाऱ्या एकालाही माझ्या माझ्या माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यालाही थोबाडायला आम्ही मागेपुढे बघणार नाही.
पक्षभेद विसरून काल मनसेच्या कार्यकर्त्याची विचारपूस करायला गेलेला नितेश राणे मला पहिल्यांदा आवडला. राज ठाकरे साहेबांचा मी चाहता आहे म्हणून नव्हे पण मुंबईतल्या या उपऱ्यांच्या गुंडगिरीला शह देणाऱ्या मनसे ला शिवसेनेकडून या आंदोलनात एखाद्या घोषणेची साथ मीळावी ही माफक अपेक्षा होती. बाळासाहेब नावाचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्यामागे गेला असला तरी आजही डरकाळी ला घाबरण्याची प्रथा आहे..पण डरकाळी न फोडण्यामागची राजकीय गणितं माझ्या बुद्धी पलीकडची आहेत. बाकी मराठी माणसाच्या हितासाठी 'त्या दोघांनी' आतातरी एकत्र यावं असली स्वप्न बघणं आता मराठी माणसांनी सोडून द्यावं.. जर तुम्हाला सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगायचं असेल तर काही असामाजिक शक्तींना ठेचायला तुम्ही स्वतः पुढे सरसावलात तरच ठीक ..नाहीतर नाक्यावरच्या फेरीवाल्याकडे ''ए भैय्या, थोडा जादा देना हं'' हे हिंदीत बोलायची सवय आहेच आपल्याला.
शांतीप्रिय मुंबईला रण करून 'भीषण संघर्ष' करण्याची भाषा करणाऱ्या कुत्र्याला त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी याचना करायला लावायची हीच वेळ आहे आणि जो पण ते करेल त्याच्या मागे सर्वानी ठामपणे उभे राहायची आजची गरज आहे.
जय महाराष्ट्र !
समीर गुप्ते.
