Monday, 30 October 2017

''याचना नही अब रण होगा, संघर्स बडा भीसण होगा''

प्रश्न ठाणे मुंबईत राहणाऱ्या सर्व युपी वाल्यांचा नाहीये बरं का.. शेकडो मित्र आहे माझे. प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे, मदतीला धावून येणारे. मेहेनतीच्या पैशातून घेतलेल्या अधिकृत घरात राहतात, कर भरतात, प्रामाणिक व्यवसाय करतात, शेजारधर्म आणि नाती सांभाळतात, भूमिपुत्रांवर प्रेम करतात, अदबीने बोलतात, सणासुदीला तुम्ही त्यांना विसराल पण ते न विसरता तुमच्या पाया पडायला येणार आणि गावाहून येताना थोडं का होईना आपल्या शेतातलं काहीतरी घेऊन येणार. यांच्याबद्द्दल बोलतच नाही कोणी. देश माझाही आहे आणि यांचाही. मोठा प्रश्न आहे या स्वभावा विरुद्ध वागणाऱ्या अनधिकृत हरामखोरांचा , शहराची जागा ढापून, आपल्या नागरी सुविधा लुटून, आपल्याशी उर्मट वागणाऱ्या आणि त्यापेक्षाही मोठा त्यांना चिथावणाऱ्या आणि पाठीशी घालणाऱ्या कुत्र्यांचा. कुत्र्या कुत्र्या बोलून कुत्र्यांचा फार अपमान तर करत नाहीये ना मी ? कारण ज्या शहरात आपण मोठे झालो त्या शहराशी अप्रामाणिक राहणारे हे हलकट नेते प्रामाणिक कुत्र्यांची उपमा देण्याच्या लायकीचे नाहीत. काय अवदसा आठवली आणि ह्या भिकारड्याना मोठं केलं अस काही मराठी नेत्यांना नक्कीच वाटत असेल.

''याचना नही अब रण होगा, संघर्स बडा भीसण होगा'' हे वाक्य आहे त्या भिकमाग्या संजय निरूपमच. काँग्रेस पक्षाचा हा उपऱ्या 'सहरअद्यक्स" काय काय बरळतोय. अरे हिम्मत होते कशी याची मुंबईत राहून भोजपुरीत बोलून अनधिकृत फेरीवाल्याना चिथवायची. स्वतःची बायका पोरं गावाला सोडून आलेली ही मंडळी दुसऱ्याच्या बायकांना कोणत्या नजरेने बघतात, रिक्षावाले तर कोणत्या पद्धतीने वागतात हा तर मोठा विषय आहे. माझे शहर स्वतःच्या बापाचे असल्याच्या थाटात वागून जर आमच्या माणसावर हात उचलणार असाल तर हात उखडून टाकायला वेळ नाही आम्हाला. प्रामाणिक मेहेनत करा, कर भरा, शहर स्वच्छ ठेवा, अधिकृत बाजारपेठा वापरा ... कोणाची ना नाही या गोष्टीला. वेगाने वाढणाऱ्या आणि मोठ्या होणाऱ्या शहरामध्ये गरज आहेच या सर्वांची. जे काम करायला आमची मुलं तयार नाहीत ती कामं तुम्ही करताय, तुमची कुटुंब एखाद्या चाळीत सन्मान पूर्वक राहताहेत, तुमची मुलंबाळं चांगलं शिक्षण घेत आहेत, एक चांगलं वातावरण तयार करून तुम्ही सामाजिक स्वास्थ्य जपताय, कौतुकच आहे तुमचं. पण आमच्या नागरी सुखसुविधा ओरबाडणाऱ्या, अनैतिक धंदे करणाऱ्यांना आणि त्यांच्या 'मुलुख' मधली गुंडगिरी आणि गचाळगिरी इथे करू पाहणाऱ्या एकालाही माझ्या माझ्या माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यालाही थोबाडायला आम्ही मागेपुढे बघणार नाही.

पक्षभेद विसरून काल मनसेच्या कार्यकर्त्याची विचारपूस करायला गेलेला नितेश राणे मला पहिल्यांदा आवडला. राज ठाकरे साहेबांचा मी चाहता आहे म्हणून नव्हे पण मुंबईतल्या या उपऱ्यांच्या गुंडगिरीला शह देणाऱ्या मनसे ला शिवसेनेकडून या आंदोलनात एखाद्या घोषणेची साथ मीळावी ही माफक अपेक्षा होती. बाळासाहेब नावाचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्यामागे गेला असला तरी आजही डरकाळी ला घाबरण्याची प्रथा आहे..पण डरकाळी न फोडण्यामागची राजकीय गणितं माझ्या बुद्धी पलीकडची आहेत. बाकी मराठी माणसाच्या हितासाठी 'त्या दोघांनी' आतातरी एकत्र यावं असली स्वप्न बघणं आता मराठी माणसांनी सोडून द्यावं.. जर तुम्हाला सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगायचं असेल तर काही असामाजिक शक्तींना ठेचायला तुम्ही स्वतः पुढे सरसावलात तरच ठीक ..नाहीतर नाक्यावरच्या फेरीवाल्याकडे ''ए भैय्या, थोडा जादा देना हं'' हे हिंदीत बोलायची सवय आहेच आपल्याला.

शांतीप्रिय मुंबईला रण करून 'भीषण संघर्ष' करण्याची भाषा करणाऱ्या कुत्र्याला त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी याचना करायला लावायची हीच वेळ आहे आणि जो पण ते करेल त्याच्या मागे सर्वानी ठामपणे उभे राहायची आजची गरज आहे.

जय महाराष्ट्र !

समीर गुप्ते.

Friday, 27 October 2017

'आपलं वडीचं सांबार'



बघा हं तुम्हाला पटतंय का ते. म्हणजे वाचल्यावर पटेलच पण तरीपण विचारतो. म्हणजे मला सांगा, जेवणात वडीचं सांबार खाल्यानंतर,  भातावर चार चार वाट्या  ओतून पोटभर जेवल्यानंतरसुद्धा परत स्वयंपाक घरात जाऊन ओट्यावरच्या त्या सांबाराच्या भांड्यावरच झाकण काढून बघता का हो तुम्ही?  खरंतर मला 'बघता ना हो तुम्ही' असच म्हणायचं होतं पण थोडं चाचरत असं बोललो. बहुतांशी मंडळींचं उत्तर 'हो' च असेल कारण माझं पण उत्तर तेच आहे. तसं माणसाने  स्वत:वरून जगाची परीक्षा करू नये पण या खाण्यापिण्याच्या परीक्षेत माझ्यासारख्या खादाडांची सगळी उत्तरं सारखीच असतात. असो.
तर आपला विषय आहे वडीचं सांबार...नव्हे 'आपलं वडीचं सांबार'.

सीकेपी सिग्नेचर डीशेस मधल्या अग्रक्रमांकावर असणाऱ्या निवडक पदार्थामधली माझी सर्वात आवडती अस म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

कसं आहे, एक तर हे वडीचं सांबार आपल्या घरी रोज रोज बनत नाही, बनलेच तर पुरता पुरत नाही, उरण्याचा प्रश्नच नाही आणि समजा चुकूनमाकून  उरलं तर उभ्या उभ्या वाटीभर पिऊन संपवल्याशिवाय आपला आत्मा शांत होत नाही. पटतंय का ?  एखादा कांदा, अर्धी वाटी नारळाचं दूध, वेलच्या, दालचिनी, चमचा दोन चमचे चण्याचं पीठ, तिखट मीठ हळद या साध्याशा वाटणाऱ्या साहित्याने जे काही भन्नाट रस्सायन तयार होतं  त्याचं नाव वडीचं सांबार. आणि चण्याचं पीठ वापरून केलेल्या काजू कतली च्या आकाराच्या पण जाडसर मोठया अशा वड्या या सांबारात सोडण्याचा एखाद्या सुग्रणीचा जो सोहळा असतो तो अवर्णनीय असतो .. एक तर जेवायला वडीचं सांबार आहे हे ऐकूनच सपाटून भूक लागलेली असते, ताटात कापलेल्या वड्यांवर हात टाकावा तर जेवताना वाटीत कमी मिळण्याची धमकी आधीच दिलेली असते आणि तरीही माझ्यासारखा एखादा उतावळा ताटात भात वाढून घेऊन ते ताट हातात धरूनच बायकोच्या बाजूला उभा असतो. एकदा का ताटात वडीचं सांबार पडलं की मांडी घालून बस्तान बसवायचं आणि वाफाळलेल्या भातावर सांबार ओतून नाकातून पाणी येईस्तोवर मनसोक्त जेवायचं. भुरक्या भुरक्याला अवीट आनंदाची साक्ष देणाऱ्या या वडीच्या सांबाराला पिऊ तेव्हडं कमी.  ते पिताना त्यातल्या  गरम गरम वड्यांचे सुसह्य आणि हवेहवेसे चटके जिभेला चोचले या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने समजावून सांगतात. आम्हा सीकेप्यांच्या घरात महिन्यातून एकदातरी अवतारणाऱ्या या स्वर्गलोकीच्या व्यंजनाला एक विशेष रंग प्राप्त झालेला असतो.. आणि तुम्हाला सांगतो खरा खवय्या या रंगावरच फिदा होतो. वडीचं सांबार कशाबरोबरही ही खाता येत असलं तरी त्याच्या चवीला योग्य न्याय द्यायला पांढऱ्या भाताशिवाय पर्याय नाही.

वाचताना भूक जागवली गेली असेल तर आजचाच बेत पक्का करा 'आपल्या वडीच्या सांबाराचा' !

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#sam here #sameergupte.blogspot.com
#ckpfood #delighful #exoticfood

Sunday, 22 October 2017

आंदोलन कोणीही करा पण या अनधिकृत फेरीवाल्याना हाकला.


काल मनसे नी केलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधातल्या आंदोलनानंतर अनेकांना फेरीवाल्यांचा पुळका आल्याचं दिसलं. वास्तविक या मंडळींनाही अनेकवेळा या फेरीवाल्यांचा त्रास होतच असेल पण तिथे बोलण्याची आणि आवाज उठवण्याची यांची हिम्मत नसते. अगदी स्वतःच्या बिल्डिंगच्या गेटवर बसलेल्या फेरीवाल्याला पण 'भाई थोडा सामान बाजूने लेना हं, आने जाने को तक्लिप होता है' असलं काहीतरी मुळमुळीत बोलल्याचं पण पाहायला मिळतं. ज्यांना या आंदोलनाचा राग आला असेल किंवा आंदोलन करणाऱ्या मनसेवर टीका करण्याची संधी साधण्याची हीच योग्य वेळ आहे अस वाटत असेल त्यांनी माझ्या काही मुद्य्यांकडे लक्ष द्यावं.
तूम्हाला फेरीवाल्यांचा इतका कळवळा असेल तर एकदा स्टेशनजवळ किंवा एखाद्या बाजारपेठेत स्वतःच्या पैशाने एक दुकान विकत घेऊन बघा.. नसेल जमत तर भाड्याने घेऊन बघा. पूर्णपणे अधिकृत बांधकाम केलेले दुकान, त्यावर दरवर्षी भरावयाचा कर, सर्व नियमांचे पालन आणि गुमास्ता फी भरल्यानंतर तुमच्या दुकानाबाहेर जेव्हा एखादा फालतू फेरीवाला माल विकून तुमच्याशी स्पर्धा करेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
स्टेशन जवळ जायच्या यायच्या रस्त्यात तुम्हाला फूटपाथ शोधावा लागतो आणि मग बेफाट रिक्षांच्या गर्दीला छेदत रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला एखाद्या वाहनाचा जोरदार धक्का लागेल आणि तुमचे आठ दिवस अंथरुणावर कळवळण्यात जातील तेव्हा तुम्हाला हा फेरीवाला नकोसा वाटेल.
स्टेशनच्या पादचारी पुलावरून गाडी पकडायला धावताना जेव्हा एखाद्या फेरीवाल्याच्या मांडलेल्या सामानावर तुमचा पाय पडल्यानंतर तुमच्या आयाबहिणिंचा जो उद्धार तो करेल आणि तुमचा जाहीर अपमान होईल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
कधी तुम्ही तुमच्या लाडक्या कटुंबाबरोबर तुमच्या एसी कारमधून खरेदीला जाल आणि थोड्या वेळासाठी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क कराल तेव्हा समोरच्या फुटपाथवर अनधीकृतपणे 'सब्जी' विकणारा तुम्हाला अतिशय उद्धटपणे गाडी पुढे घ्यायला सांगेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांबरोबर जे बिनकामाचे भिकारxx लोक गप्पा मारत बसलेले असतात त्यात काही त्यांचेआश्रयदाते, भाई, दादा पण असतात. हे लोक जेव्हा तुमच्या घरातल्या स्त्री ची छेडखानी किंवा अपमान करतील आणि तुम्ही हतबल असाल तेव्हा तुम्हाला ते नकोसे वाटतील.
संध्याकाळी देवळात जाणाऱ्या तुमच्या म्हाताऱ्या आईबापाला या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे जेव्हा रस्त्यात नीट चालता येणार नाही आणि एखाद्या अडचणीच्या ठिकाणी पडून त्यांचे एखादे हाड मोडेल कदाचित तेव्हा तुम्हाला हे फेरीवाले नकोसे होतील.
स्वच्छतेची काळजी न घेता, हायजिनचे कोणतेही नियम न पाळता विकायला ठेवलेल्या चायनीज भेळ, पाणीपुरी, रंगीत सरबत असल्या टुकार गोष्टी खाऊन तुमच्या लहान मुलांना एखादा आजार होईल तेव्हा तुम्हाला हा रस्त्यावरचा फेरीवाला नकोस होईल.
तुमचे शहर, तुमचे रस्ते, तुमचे फूटपाथ यावर कब्जा करण्यासाठी प्रामाणिक पोलिसांना पण अप्रामाणिक बनण्याची लालूच देणारे आणि गुंडगिरीचा आधार घेणारे हे फेरीवाले कसे सहन होतात तुम्हाला. बरं ' मग त्यांना हटवणाऱ्या राज ठाकरेंनी त्यांना नोकऱ्या द्याव्यात' असलेही मूर्ख मेसेज वाचण्यात आले. मला तर हा मूर्खपणा कळतच नाही. अरे ज्या फेरीवाल्यांनी काही महिन्यांपूर्वीच ड्युटीवर असलेले ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती त्या फेरीवाल्यांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. खरं तर यांना लाथ मारून हाकलायचं काम पोलिसांचं आणि प्रशासनाचं. पण तिथूनही काही कारवाई नाही. मग एखाद्याने हे काम केलं तर चुकलं कुठे. आपल्या समक्ष चाललेल्या या गोष्टींकडे डोळेझाक करत स्वतः आंधळ्यासारख जगायचं आणि तुमचा रस्ता मोकळा करणाऱ्याला मात्र गुन्हेगारासारखं पाहायचं हे बरोबर नाही.
ज्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरात कचरापट्टी वाढते, रोगराई वाढते, अपघात होतात, गुंडगिरी वाढते, भ्रष्टाचार बोकाळतो त्यांना रोखलेलं कधीही चांगलं. इथे मराठी अमराठी हा तर मुद्दाच नाही - अधिकृत आणि अनधिकृत हाच मोठा मुद्दा आहे. लक्षात घ्या, महानगरपालिकेचा योग्य कर भरून, लोकवस्त्यांमध्ये फिरत गाडीवर भाजीपाला विकणाऱ्या किंवा इतर फेरीवाल्यांबद्दल बोलत नाहीये मी.. शहरातले फूटपाथ ढापणाऱ्या आणि शहराचे सौन्दर्य नष्ट करणार्यांबद्दल माझा आक्षेप आहे.
आणि इतका त्रास असतानाही ज्यांना या अनधिकृत फेरीवाल्यांसाठी इतकी सहानुभूती असेल त्यांनी द्यावीत की त्यांना अधिकृत दुकाने घेऊन - एखाद्याला सन्मानपूर्वक जगण्याची दिशा दिल्याचं समाधान तरी तुम्हाला मिळेल.
समीर गुप्ते